
pik vima Yojana 2025:-गेल्या पाच ते सहा दिवसात एवढ्या शेतकऱ्यांनी उतरवला पिक विमा, तुम्ही पिक विमा काढला का? आता पर्यंत पिक विम्याची जमा केलेली रक्कम ही 3 कोटी 85 लाख रुपये एवढी, 1 जुलैपासून ते आज पर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे?
पिक विमा योजना 2025 चालू झालेली आहे, त्यामध्ये खरीप हंगामातील विविध पिकांसाठी संरक्षण म्हणून पीक विमा योजनेमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आपला सहभाग नोंदवत आहेत. गेल्या वर्षी एक रुपयात पिक विमा योजना होती त्यामुळे राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवलेला होता, परंतु यावर्षी मात्र एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याने शेतकरी पिक विमा भरणार की नाही, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झाला होता, तर आपण जाणून घेऊया की 1 जुलैपासून ते आज पर्यंत या राज्यातील किती शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवलेला आहे.
यावर्षी सुधारित पिक विमा योजना चालू करण्यात आलेली असल्याने शेतकऱ्यांना प्रीमियम भरून पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवता येणार आहे, व हा पिक विमा भरण्याची टक्केवारी ही प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे, व प्रत्येक पिकानुसार वेगवेगळी आहे, पिक विम्याची असलेली ठराविक रक्कम भरल्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पिकाचे संरक्षण म्हणून पिक विमा योजनेत सहभाग दिला जाईल.
64 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवलेला आहे व अजूनही पीक विमा योजना 30 जुलैपर्यंत चालू असणार आहे, 30 जुलै पर्यंत मोठ्या संख्येने शेतकरी अजूनही सहभाग नोंदवतील व तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे सुद्धा आव्हान राज्य शासनाच्या कृषी विभागाने केले आहे. कारण शेतकऱ्यांना पिक विमा भरल्यानंतर शेती पिकासाठीचे संरक्षण मिळते.
64 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याने आतापर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याची जमा केलेली रक्कम ही तीन कोटी 85 लाख रुपये एवढी आहे. त्याच पद्धतीने राज्यातील नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिक विमा योजनेमध्ये आत्तापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे अशा प्रकारे विविध पिकानुसार विविध प्रकारची रक्कम पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना भरावी लागते. व 30 जुलै पर्यंत पिक विमा योजनेत सहभाग नोंदवता येईल.
Leave a Reply